बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी अॅड.बी.सी.कांबळे...व त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान...!!!

1] बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी.सी.कांबळे... उद्या (दि. १५) रिपब्लिकन नेते अॅड . बी. सी. उर्फ बापूसाहेब कांबळे यांची जन्मशताब्दी आहे. संपादक, वक्ता, संसदपटू, घटनातज्ज्ञ, बाबासाहेबांचे चरित्रकार व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार असणाऱ्या कांबळे यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... १९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ साली पुणे येथे 'पुणे करार रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच इतिहासात 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात तीन सत्याग्रह केले. त्यातील पहिला होता १९२७ सालचा महाडचा सत्याग्रह. पाण्यासाठी केलेला हा सत्याग्रह मूलभूत मानवी हक्कांसाठी होता. दुसरा सत्याग्रह म्हणजे १९३० ते ३५ सालापर्यंत केलेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हा समाज धार्मिक हक्कांसाठी होता. तिसरा व शेवटचा सत्याग्रह 'पुणे करार रद्द करा...