Posts

Showing posts from May, 2025

बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी अ‍ॅड.बी.सी.कांबळे...व त्यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान...!!!

Image
1] बाबासाहेबांचे निष्ठावंत अनुयायी बी.सी.कांबळे... उद्या (दि. १५) रिपब्लिकन नेते अ‍ॅड . बी. सी. उर्फ बापूसाहेब कांबळे यांची जन्मशताब्दी आहे. संपादक, वक्ता, संसदपटू, घटनातज्ज्ञ, बाबासाहेबांचे चरित्रकार व त्यांच्या तत्त्वज्ञानाचे भाष्यकार असणाऱ्या कांबळे यांच्या कार्याची ओळख करून देणारा हा लेख... १९४६ साली भारतात आलेल्या कॅबिनेट मिशनने अस्पृश्यांचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व नाकारल्यामुळे व येथील काँग्रेस पक्षाचे पुढारी येऊ घातलेल्या स्वराज्यात अस्पृश्य वर्गाचे स्थान काय राहील हे स्पष्ट करत नसल्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ जुलै १९४६ साली पुणे येथे 'पुणे करार रद्द करा'ची मागणी करणारा सत्याह सुरू केला. यालाच इतिहासात 'पुणे सत्याग्रह' म्हणतात. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात तीन सत्याग्रह केले. त्यातील पहिला होता १९२७ सालचा महाडचा सत्याग्रह. पाण्यासाठी केलेला हा सत्याग्रह मूलभूत मानवी हक्कांसाठी होता. दुसरा सत्याग्रह म्हणजे १९३० ते ३५ सालापर्यंत केलेला काळाराम मंदिराचा सत्याग्रह. हा समाज धार्मिक हक्कांसाठी होता. तिसरा व शेवटचा सत्याग्रह 'पुणे करार रद्द करा...

संसद नव्हे, संविधानच सर्वोच्च...!!!

Image
  संसद नव्हे, संविधानच सर्वोच्च...!!!  भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलीकडेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाविरुद्ध अत्यंत विखारी अशी गरळ ओकली आहे. ते संविधानातील अनुच्छेद 142 ला न्यायालयाच्या हातातील आण्विक शस्त्र असे संबोधून संविधान निर्मात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाच अप्रत्यक्षपणे अपमान करीत आहेत असे म्हंटल्यास वावगे होणार नाही. त्यापाठोपाठ भाजपचे प्रक्षोभक वक्तव्ये करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेले खासदार निशिकांत दुबे यांनीही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्यावर देशात धार्मिक दंगली माजविण्यास कारणीभूत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. या दोघांच्या पाठोपाठ रा. स्व. संघ-भाजपच्या समाज माध्यमावरील ट्रोलसेनेने संसद हीच सर्वोच्च आहे, संसदेला काहीही करण्याचा अधिकार आहे, सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीला निर्देश देऊ शकत नाही, संसदेने केलेल्या कायद्याची किंवा संविधानाच्या दुरुस्तीची समीक्षा करण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाला नाही अशा प्रकारचा संविधान विरोधी गदारोळ माजविला आहे. ज्यांना भारतीय संविधांनाचा प्राथमिक अभ्यास आहे अशा कोणत्याह...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान...!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान - प्रा. हरी नरके डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बदनामी करणारे हिंदुत्ववादी खोडसाळपणे असे सांगतात की त्यांनी आदिवासींसाठी काहीच केले नाही. केले ते फक्त स्वत:च्या जातीसाठी. आदिवासींचा बुद्धीभेद करण्यासाठी त्यांचे एखादे वाक्य संदर्भापासून तोडून विकृत करून समोर ठेवले जाते. आणि अफवा तंत्र वापरून ही कुजबूज गॅंग विष पसरवित राहते.  तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आदिवासींसाठीचे मौलिक योगदान काय होते, आहे याची वस्तुस्थिती आपण पुराव्यांनिशी बघूयात. १] " अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट " हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ. मास्टरपिस. १९३६ सालच्या या पुस्तकात बाबासाहेबांनी संपुर्ण एक प्रकरण आदिवासींच्या समस्या, वेदना, दु:ख आणि ते दूर करण्याचे मार्ग यावर लिहिलेले आहे. त्यात ते म्हणतात, " भारतीय आदिवासींना आज दु:खाच्या, गुलामीच्या अंधार्‍या गुहेत जनावराचे जीवन जगायला भाग पाडण्यात आलेले आहे. त्यातल्या काहींवर तर गुन्हेगारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे. या आपल्याच बांधवांना जनावरासारखे वागवताना हिंदुंना त्याची लाजसुद्धा वाटत नाही....