Posts

Showing posts from October, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा.. !!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथसंपदेचा संक्षिप्त आढावा.. !!लोकसत्ता ऑनलाइन | April 14, 2018 05:06 am भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांडपंडित होते. त्यांचा विविध विषयांवरचा व्यासंग अफाट होता. त्यांनी अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. त्यातून अनेक अत्यंत महत्त्वाच्या ग्रंथसंपदेची निर्मिती झाली. या ग्रंथसंपदेतूनच त्यांची सर्वसमावेशक आणि समन्यायी अशी वैचारीक भूमिका स्वयंस्पष्ट होते. त्यांच्या ग्रंथांचा संक्षिप्त आढावा या लेखात घेण्यात आला आहे... Administration and Finance of the East India Company (ईस्ट इंडिया कंपनी प्रशासक आणि अर्थनीती) – डॉ. बाबासाहेबांनी अॅॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी हा शोधनिबंध, एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५  मध्ये सादर केला होता. हा केवळ ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांची बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे.  हे बदल भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे...

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !!

Image
1】 घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !! घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !" १)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर. २) एन.गोपालस्वामी अय्यंगार. ३) डी.पी.खेतान. ४) कृष्णास्वामी अय्यर. ५) बी. एल. मित्तल. ६) के. एम.मुन्शी. ७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३७९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत-पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्...

धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुध्दमूर्ती?

Image
धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुध्दमूर्ती? लाखो समाजबांधवांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्यामागं अनेक हात काम करत होते. बाबासाहेबांनी आदल्या रात्रीच दीक्षा समारंभात बुद्धमूर्ती आणायला सांगितल्यानं कार्यकर्त्यांवर कसा बाका प्रसंग ओढवला होता, त्याविषयीच्या आठवणी जागवताहेत आता ९५ वर्षांचे साक्षीदार के. एन. खरे. १४ ऑक्टोबर १९५६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या ५ लाख अस्पृश्य समाजबांधवांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. ११ तारखेलाच बाबासाहेबांचं माईसाहेबांसमवेत नागपूरात आगमन झालं. बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या तयारीची सर्व जबाबदारी बौद्ध जन सभेच्या नागपूर शाखेकडे होती. वामनराव गोडबोले हे या सभेचे प्रमुख होते. नागपुरात आल्या आल्या बाबासाहेबांनी या सोहळ्याच्या तयारीबाबत बैठका घेतल्या. श्याम हॉटेलची रूम नंबर ११६ म्हणजे बाबासाहेबांची 'वॉर रूम'च जणू. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं. धम्म दीक्षा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भिक्षूंनी परित्राण पाठाला सुरवात केली. श्याम हॉटेलच्या रूम नंबर ११६ च्या खिडकीतून बाबासाहेब बाहेर बघत होते. ...

बुध्दाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन... !!

Image
1】 बुध्दाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन.. !! बुद्ध स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता अशा आशयाची मांडणी अधूनमधून काही ब्राह्मणवादी किंवा डाव्या पुरोगामी चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांकडून केली जाते. वास्तविकतः अशा प्रकारची मांडणी कॉ, शरद पाटील यांनी प्रथमतः केली. बाकी इतर सर्वजन त्यांची री ओढतात. बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता ठरविण्यासाठी बुद्धाने स्त्रियांच्या संघ प्रवेशाला प्रथमतः अनुमती नाकारणे व नंतर जेव्हा अनुमती दिली त्यावेळी प्रव्रजित स्त्री भिक्खुनीना आठ गुरुधम्माच्या अटी बंधनकारक करणे हे एकमेव उदाहरण दिले जाते. या एकाच कारणामुळे बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक ठरविणे म्हणजे ओढून ताणून बुद्धावर स्त्रीयांविषयी अनुदार किंवा पक्षपाती असल्याचे लांछन लावणे होय. बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन तपासायचा असेल तर केवळ एकमेव तेही सोयीनुसार अर्थ लावलेल्या उदाहरणावरून नव्हे तर बुद्ध विचाराचे समग्र विश्लेषण करूनच तपासले पाहिजे. या अनुषंगाने बौद्ध साहित्यातील समकालीन संदर्भाच्या आधारे बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न या संदर्भाती...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण... व धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोकविजयादशमीचं महत्व..!!!!!

Image
1】 !! धम्मचक्र प्रवर्तन   दिन अशोकविजयादशमीच    १४ ऑक्टोंबर नव्हे !! माझ्या अनेक लेखात बौद्ध धम्माचे विकृतीकरण या सदराखाली मी दशहरा / दसरा या विषयी विस्तृत माहिती लिहीलेली आहे . रावण , दसबळी इ . जे मांडले गेले आहे ते संपूर्ण बौद्ध धम्माच्या पाडवानंतरचे चित्रण आहे . आज कोणी रावण किवा म्हैसासूर यांची उदाहरणे देऊन मांडत असेल किंवा आवतन देऊन सांगत असतील तर तो बौद्ध धम्माच्या दृष्टीने निरुपयोगी गोष्ट आहे . बौद्ध धम्माचा इतिहास आणि अभ्यास करून पाहिलं तर या सर्व गोष्टी बौद्ध धर्माला शह देण्यासाठी होत्या म्हणून काल्पनिकतेने सांगितल्या गेलेल्या पात्रांना मोठ करण्यात काहीही उपयोग नाही . ज्यांचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावे आहेत असाच बौद्ध धम्म सांगणे सर्वात अगोदर महत्वाचे आहे , रावण अथवा म्हैसासुर अशी पात्रे रंगवून सांगणे आणि बौद्ध धम्माचे महत्व लपविण्यासारखे आहे . बाबासाहेबांनी अशोक विजयादशमी चे महत्व ओळखून आणि त्यादृष्टीने येणारी तारीख १४ ऑक्टोबर १९५६ निवडली, ती १४ ऑक्टोबर म्हणून नव्हे तर अशोक विजयादशमी म्हणून त्यामुळे काही लोक म्हणत असतील कि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ...