Posts

Showing posts from August, 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ...बाहेर देशात पोहचवणारे राजू कांबळे...!!

Image
राजकुमार दौलतराव कांबळे.... ४ जानेवारी 1954 रोजी बाबासाहेबांनी दिक्षा दिलेल्या भुमीत म्हणजेच नागपुर,महाराष्ट्र येथे सरांचा जन्म झाला.. राजु कांबळे एक निर्भीड, दुरदृष्टी असलेल व्यक्तीमत्व त्यांची ओळख..एक दिग्गज आंबेडकरवादी तसेच आपल्या मताशी ठाम असणारे म्हणुन त्यांना जाणल जायच. त्यांच समाजोद्धाराच कार्य हे पिचलेल्य-शोषित, वंचित वर्गांसाठी होत. आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या सर्व आंबेडकरवादी लोकांमधले ते एकमेव दुवा म्हणुन काम करायचे. सर्वांना एकत्रित करण्याच मोठ काम त्यांनी केल.. सर्वांना आकर्षित करणार व्यक्तीमत्व, विद्वत्ता, मनमिळाऊ गुण, मैत्रेयी वृत्ती, निस्वार्थीपणा, स्वाभिमानी,समाजासाठी अचुक निर्णयी योगदान, प्रचंड इच्छाशक्तीने आंबेडकरवादी चळवळ पोहचवण्याच काम सरांनी केलय... एक संशोधक म्हणून काम करत असताना.. राजु कांबळे सर एक यशस्वी केमिकल इंजिनियर होते. LIT, नागपूर मधुन केमिकल इंजिनियरिंगची डिग्री व तसेच IISc, बेंगलोरलमधुन केमिकल इंजिनियरिंगची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री त्यांनी प्राप्त केली. अमेरिका, कॅनडा, इटली, U.A.E, आणि मलेशिया सारख्या देशात ते अॉईल एक्स्पलोरेशन आणि पेट्रोकेमिकल्...

२६ नोव्हेंबर भारतीय संविधान गौरव दिन... व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर१९४९ रोजी घटना समितीच्या बैठकीत केलेले उद्बोधक भाषण .. !!

Image
1】 लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन सुरक्षित ठेवायचे असेल तर... २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत शेवटचे भाषण केले. या भाषणात आंबेडकरांनी भारतापुढील ज्या समस्यांचा उहापोह केला आहे, त्याचे स्वरूप आजही बव्हंशी तसेच आहे. आज, 26 नोव्हेंबर. 'संविधान दिन. त्यानिमित्ताने या भाषणाचा हा अंश... माझ्या मते, संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरूपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग – जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून ...

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला...? व बौध्द पौर्णिमेबद्दल माहिती...!!!

Image
1]  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला...?   बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोटय़वधी अनुयायांसह केलेला बौद्ध धर्माचा स्वीकार ही क्रांतिकारक घटना. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्माचे थोर उपासक, बौद्धधर्म प्रवर्तक व महान बोधीसत्व होते. तसेच ते बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञ, विद्वान, लेखक व पुनरूत्थानक होते. एकेकाळी भारतातून लूप्त झालेला बौद्ध धर्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा पुनर्जीवीत केला. भारतीय बौद्धांपैकी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यानंतर डॉ. आंबेडकरांनीच भारतीय बौद्ध धर्मासाठी सर्वाधिक कार्य केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना हिंदू धर्म सोडायचाच होता, पण इतके सगळे धर्म अस्तित्वात असताना त्यांनी बौद्ध धर्मच का निवडला असा प्रश्न पडतो. बौद्ध धर्म इतर कोणत्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तो मानवतावादी आहे, त्यात जातीभेद आणि अस्पृश्यता या गोष्टी नाहीत आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला का?. तिची बीजं त्यांच्या मनात कशी रुजत गेली? बाबासाहेब ...