Posts

Showing posts from November, 2018

बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....!!

Image
बाबासाहेबांचा राज्यसभा प्रवेश....! अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास नव्याने खोटा लिहिण्याचा आणि सांगण्याचा खटाटोप मोठ्या अहमहमिकेने अनधिकारी नेते करीत आहेत. कुणी त्यांना 'फॉल्स गॉड' ठरवतो तर कुणी त्यांना निझामाकडून मदत घेतल्याचे सांगतो. यावर कळस असा की, त्यांना बंगालमधून डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनी राज्यसभेत निवडून पाठविल्याचे ठोकून देतो. त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करून त्यांचा अपमान केल्याने समाधान न झाल्यामुळे, ऐतिहासिक असल्याच्या माध्यमातून त्यांचा इतिहासही डागाळण्याचा अश्लाघ्य उपद्व्याप करण्यापर्यंत बिचाऱ्यांनी मजल मारली. वास्तविक पहाता ऐतिहासिक सत्य वेगळेच आहे. परंतु ते अज्ञातही नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा घटना समितीवर जाण्याचा पक्का इरादा होता. परंतु प्रांतिक विधिमंडळाने घटना समितीवर जाणाऱ्या प्रतिनिधींची निवड करावयाची होती. मुंबई विधिमंडळात डॉ. आंबेडकरांचे पक्षाचे सभासद नव्हते. दलित वर्गास मंत्रिमंडळ व विधिमंडळात पुरेसे प्रतिनिधित्व मिळविण्यासाठी ते जीवापाड प्रयत्न करीत होते. हंगामी मं​त्रिमंडळात जोगेंद्रनाथ मंडल आणि जगजीवनराम हे दोन प्रतिनिधी दल...

शेती शेतकरी आणि बाबासाहेब... !!

Image
1】 शेती शेतकरी आणि बाबासाहेब... !! सत्याचे, समर्पण भावाचे, दूरदृष्टीचे, बुद्धिमत्तेचे, मानवतावादी नवविचारांचे, राष्ट्रभक्तीचे, राष्ट्रहिताचे आणि सर्व समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणा-या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील गौरवशाली पर्व आहे.भारतीय अस्मितेचे हे प्रतीक आहे. उपेक्षित समाजासाठी त्यांनी अभूतपूर्व योगदान दिले आहे. उपेक्षित, वंचित आणि महिलांनाही सामाजिक समतेचे समान हक्क आणि अधिकार मिळायलाच हवेत, यासाठी आपले जीवन समर्पित करणा-या सामाजिक समतेच्या चळवळीचे उद्गाते, महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह परिषदेतील जाहीरनामा शोषितांच्या मुक्तीचा आणि सामाजिक समतेच्या कृतिशील विचारांचा मंत्रजागर करणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती भारतासह सा-या जगभरात साजरी होत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या समतावादी विचारांचा आणि चळवळीचा मागोवा घेतला जाईल. आज कोणत्याही शाळा, कॉलेजात गेलात आणि बाबासाहेबांबाबत विध्यार्थ्यांना किती माहिती आहे हे विचारले, तर यातले तथ्य आढळून येईल. हीच परिस्थिती अनेक भारतीयांची आ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची बुध्दीप्रामाण्यवादी पत्रकारिता व त्यांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी...!!!

Image
1】बाबासाहेबांची पत्रकारितेतील लक्षणीय कामगिरी.. !! अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत बाबासाहेबांनी वर्तमानपत्रे काढली आणि चालविली. त्यांची वैचारिकता, पोटतिडीक, निर्भीडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या वृत्तपत्रीय लेखनात पडलेले दिसते. सर्वसामान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दांत लिखाण करीत, ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला.... ‘इं ग्रजीपेक्षा मराठीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लिखाण थोडे आहे हे खरे; तथापि ज्या बहिष्कृत वर्गात ते जन्मले त्या वर्गाच्या कैफियती मांडताना सर्वसामान्य साक्षर व्यक्तीलादेखील समजेल, अशी सुबोध भाषा त्यांनी वापरली आहे. जाडे पंडिती व लठ्ठ अवघड शब्द त्यात फारच थोडे आढळतात. पंडित असूनही विद्वत्तेचा अहंकार त्यांच्या भाषेत नाही. हिंदुधर्माला यापुढे तरी जगायचे असल्यास डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीकडे पाठ फिरवून चालणार नाही.’ ‘नवभारत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखातील हे मत बाबासाहेबांच्या पत्रकारितेतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रकाश टाकणारे आहे. ‘मराठी भाषेसंबंधी बोलताना जे फक्त साहित्याच्याच क्षेत्रात असतात, त्यांच्याच शैलीचा उल्लेख होतो. पण सरल प्...

डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गोलमेज परिषदा....!!

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर  (गोलमेज परिषद- पहिली) सायमन कमिशनचा प्रतिवृत्तांत आला: ईकडे नाशीकात जरी काळाराम मंदिराचा सत्याग्रह जोरात चालु होता तरी राजकीय पातळीव घडणा-या घडामोडींवर बाबासाहेब नजर ठेवुन होते. सायमन समिती लवकरच आपला प्रतिवृत्त सादर करणार होती व त्या मधे अस्पृश्यांच्या पदरात काय पडले हे जाणून घेण्यासाठी बाबासाहेब अत्यंत आतुर झाले होते. अखेर मे १९३० सायमन समितीने आपला प्रतिवृत्त जाहिर केला. भारतातील निवडणुकीमध्ये जातवार मतदार संघ ठेवण्याची शिफारस केली. हिंदुना  मध्यवर्ती विधीमंडळात २५० पैकी १५० जागा मिळणार होत्या. अस्पृश्य हिंदुना संयुक्त मतदार संघात राखीव जागा देण्यात आल्या. परंत अस्पृश्य वर्गातील उमेदवारांची निवडणुकीस उभे राहण्याची पात्रता ठरविण्याचा अधिकार राज्यपालाना देण्याचा मुर्खपणा या सायमन समितीनी केला होता. ८ ऑगस्ट १९३० रोजी नागपूर येथे अखिल भारतीय बहिष्कृत परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्षपद बाबासाहेबानी भूषविले. ब्रिटिशांवर कडाडुन टिका केली. ब्रिटिशांमुळे स्वातंत्र्य, समता व बंधुता रुजविण्यात जरी मदत होत असली तरी स्वराज्य हवेच आहे. कारण ब्रिटिशांच्...