Posts

Showing posts from July, 2018

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही विविध पैलू...!!!

Image
1 】 माणूस कितीही मोठा असला तरी बायकोपुढं तो तीचा नवरा असतो. हक्काचा मित्र असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही वेगळं नव्हतं. बाबासाहेब कोलंबियाहून परतले. चळवळीत पूर्णवेळ उतरण्याआधी त्यांनी स्वतःला एका चांगल्या वकिलाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आपली पूर्ण ताकद लावली. बाबासाहेब कित्येकदा सकाळी सात ला घरातून निघाले तर रात्री पार एक दोन वाजता घरी येत. अशातच त्यांना विधी महाविद्यालयात म्हणजे आजच्या जीएलसी (लॉ कॉलेज) ला व्याख्याता म्हणून काम करण्याचं निमंत्रण मिळालं. बाबासाहेबांनी ते स्विकारलं. कालांतराने ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य देखील झाले. पण हा किस्सा त्यांच्या व्याख्याते असण्याच्या कालखंडातला. त्यावेळेस डॉ. आंबेडकरांचे लेक्चर म्हटलं की, बाहेरच्या अनेक कॉलेजेस मधून विद्यार्थी, प्राध्यापक जातीनं हजेरी लावत. त्यांच्या व्याख्यानांच्या नोट्सवर अनेकदा बॉम्बे क्रॉनिकल्स मध्ये आर्टिकल छापून येत. खूप मोलाचे डॉक्युमेंट होते ते. पण कुणीही सांभाळून न ठेवल्याने आता ते उपलब्ध नाहीत. तर बाबासाहेबांना या व्याख्यानांचं बऱ्यापैकी मानधन मिळायचं. मानधन मिळालं की, बाबासाहेब ते आणून सरळ रमाई...

डॉ बाबासाहेब आंबेडकर लंडन अमेरिका प्रवास व तेथील शिक्षण अनुभव...!!

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (अमेरिकेस रवाना) वडलांच्या मृत्युनंतर भीमराव खचुन गेले. आज पर्यंत सगळ्या दुनियाशी झगडताना सुभेदार कायम पाठीशी उभे असायचे. भीमरावांचा कायमचा आधार एकाएकी नाहिसा झाला होता. बडोद्यात जाऊन नोकरीवर रुजु होण्याची ईच्छा होत नव्हती. पण अबोल महत्वकांक्षा गप्प बसु देत नव्हत्या. दलित समाजाचं नेतृत्व आज वडिलांच छत्र हरविल्यामुळे पोरकं झालं होतं. सावरायला थोडा वेळ लागणार होता. वरुन कुटुंबाची जबाबदारी यांच्यावरच पडली होती.  आता दोन दोन आघाड्यावर लढायचं होतं. कुटुंब प्रमुख अन जातियवादी व्यवस्था अशा आघाड्यावर लढण्याची तय्यारी करावी लागणार होती. शेवटी शेवटी वडील कर्जबाजारी झाले होते. एकंदरीत परिस्थीती फार बिकट होती. एकाच वेळी ब-याच अडचणी येऊन दारात धडकल्या होत्या. याच चिंतेत असताना बडोदा नरेशांची मुंबईत भेट घेण्याची संधी मिळाली. याच दरम्यान बडोदा नरेशानी ४ विद्यार्थ्याना अमेरीकेत उच्च शिक्षणघेण्यासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली. या भेटीत महाराजानीच भीमरावाना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज दाखल करण्यास सांगितले. भीमरावानी तसा अर्ज दाखल केला. बडोदे राज्यातील शिक्षण मंत्र...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (सायमन कमिशन )

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (सायमन कमिशन ) भागवतधर्मी संतांचे बंड चातुर्वर्ण्य मिटविण्याच्या दृष्टिने महाराष्ट्रात भागवतधर्मी संताने ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड केले होते. पण या बंडाचा पायाच मुळात चुकीचा होता. इतर सर्व माणसांप्रमाणे माणुस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वरभक्त श्रेष्ठ असा तो विचित्रसा लढा होता. सुरुवातीला या लढ्याकडे अस्पृश्यानी मोठ्या आशेनी पाहिले. हा लढा शेवटी भागवतधर्मीयानी जिंकला व ब्राह्मणापेक्षा ईश्वरभक्त श्रेष्ठ असा सर्वमान्य निकाल आला पण या सगळ्या निकालातुन अस्पृश्य निर्मूलनाला पाठबळ मिळेल असं काहीच निघालं नाही. ब्राह्मण श्रेष्ठ कि शुद्र हा प्रश्न निकाली निघालाच नाही. किंवा या दोहोतील ना ब्राह्मण श्रेष्ठ ना शूद्र, दोघेई समान आहेत हे सत्य अलगद बाजुला पडलं. उलट या भागवतधर्मीयांच्या लढ्याच्या निर्णयामूले ब्राह्मणाच्या हाति शूद्रांचे शोषण करण्यासाठी एक नविन मुद्दा आला. तुम्ही ईश्वर भक्त आहात हे आधी सिद्ध करा अन तदनंतरच ब्राह्मणांच्या बरोबरीच्या बाता करा. आता ईश्वरभक्ती सिद्ध करण्याचं नविन आव्हाहन परत एकदा अस्पृश्यांच्या प्रगतीत अडचण बनुन उभं होतं. चोखाम...

संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान...!!!

Image
1】  संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आंबेडकरी चळवळीचे योगदान...!! संयुक्त महाराष्ट्र आंदोलन हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशात ऊभारले गेलेले सर्वात मोठे आंदोलन होते. मुंबई, बेळगाव, कारवार, धारवाडसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरली होती. हा इतिहास सांगताना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांचा ऊल्लेख नेहमीच केला जातो पण तसे करताना त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व आंबेडकरी चळवळीचे योगदानाची दखल मात्र ठळकपणे घेतली जात नाही हे कटू असले तरी सत्य आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे योगदान समुजन घेण्यासाठी या आंदोलनाची पार्श्वभुमी समजून घेणे आवश्यक आहे. स्वतंत्र भाषावर प्रातरचनेसाठी देशाच्या विविध भागतून मागण्या वाढत चालल्या होत्या. भारताच्या विविध प्रांतांतून होणा-या भाषवार प्रांतरचनेच्या मागणीव्या दबावाखाली कॉग्रेसने राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद सिंह सहीने १७ जुन १९४८ रोजी धार कमिशनची स्थापना केली. भाषावार प्रांतरचना करावी की नाही हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी धार कमिशनवर होती. अलाहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधिश एस.क...