Posts

भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास...!!!

Image
1】 चला आता... एक दीर्घ लेख देत आहे, मला माहीत आहे कोणीही वाचनार नाही, परंतु रेकॉर्ड रहावे म्हणून इथे पोस्ट करून ठेवत आहे... तुम्ही ही सेव्ह करून ठेवा, निवांतपणे वाचा... ❤️ ---------------------------------------------------------------------------- पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगांवची लढाई -  १ जानेवारी १८१८ ---------------------------------------------------------------------------- ५ नोहेंबर१८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१डिसेंबर १८०२रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही देणे लागत होते. त्यासंबंधाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशव्यांशी बोलणी करण्याकरीता गंगाधरशास्त्री हे वकील म्हणून पुण्याला आले. परंतु, त्यांचा पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या खून झाला. हा खून बाजीराव पेशव्याच्या सांगण्यानुसार त्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली...!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?यशवंत मनोहर...!!! डॉ. यशवंत मनोहर विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ‘डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?’ ही पुस्तिका २००५ साली प्रकाशित झाली आहे. नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित मजकूर… मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६).  या ठिकाणीच मांडल्या गेलेल्...

स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...!!!

Image
स्टॉक मार्केट, ट्रेडिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!!! (कधीच, कुठेही पुढे न आलेली बाजू) आजही आपल्या अवतीभोवती अशी बरीच मंडळी आहे की माहितीचा अभाव किंव अवेअरनेस नसल्यामुळे गुंतवणूकीसाठी शेअर मार्केटचा पर्याय निवडत नाहीत. शेअर बाजाराबद्दल सुस्पष्ट माहिती उपलब्ध असतानाही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूकीसाठी धाडस होत नाही. पण जवळपास 107 वर्षांपुर्वी एका मराठी माणसाने स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी स्थापन केली होती.  ज्या स्टॉक मार्केटमध्ये मराठी माणसाचा टक्का वाढन्यासाठी 2021 उजाडावं लागलं त्याच स्टॉक मार्केटमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 107 वर्षांपुर्वी पाऊल ठेवलं होतं.  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु आहेत. एकाच आयुष्यात त्यांनी फार वेगवेगळ्या भूमिका बजावल्या आहेत. ज्या भूमिका आज सुद्धा आदर्श मानल्या जातात. ते एक उत्तम वक्ते होते, राजनेता होते, पत्रकार, संपादक, लेखक, संशोधक, समाजसुधारक होते, पण आज त्यांच्या आयुष्यातल्या आणखी एका पैलुबद्दल आपण बोलतोय. तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि गुंतवणूक. 1916 मध्ये बाबासाहेब आंबेडकर हे कोलंबियातून शिक्षण घेऊन भारता...

SC आरक्षण उपवर्गीकरणावर बौद्धांची भूमिका...!

Image
  1]  SC आरक्षण उपवर्गीकरणावर बौद्धांची भूमिका...! A) 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला मान्यता दिली. इम्पिरिकल डेटा च्या आधारे राज्याला आवश्यकता वाटली तर ते राज्य अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करू शकते. असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 रोजी माजी न्यायधीश अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासाठी एक कमिटी गठीत केली, ज्याची मुदत या महिन्यात अर्थात सप्टेंबर 2025 ला संपत होती. तिला परत सहा महिन्यांची मुदत वाढ मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या हालचाली सुरू केल्या आहेत. B) ब्रिटिशांनी 1872 ला पहिली जनगणना केली. 1911 ला अस्पृश्य जातींच्या समूहाची पहिल्यांदा जनगणना झाली. 1911 च्या जनगणनेत अस्पृश्य लोक ओळखण्यासाठी खालील दहा निकष वापरले गेले: 1. ब्राह्मणांची श्रेष्ठता नाकारणे: या लोकांना ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व किंवा वरचे स्थान मान्य नव्हते. 2. गुरु कडून मंत्र न घेणे: हे लोक ब्राह्मण किंवा इतर मान्यताप्...

आरक्षण वर्गीकरण : आरक्षण नष्ट करण्याचे कारस्थान...!!!

Image
1] आरक्षण वर्गीकरण : आरक्षण नष्ट करण्याचे कारस्थान भाग -१    आरक्षण किंवा सामाजिक व शैक्षणिक मागास समूहांना नोकऱ्या व शिक्षणामध्ये देण्यात येणाऱ्या राखीव जागा हा स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणात सदैव धगधगत असलेला सर्वात विवाद्य मुद्दा ठरला आहे. एकीकडे आरक्षणाचे विरोधक आरक्षणामुळे त्यांच्या वाट्याचे लाभ अपात्र समूहांना वाटले जात आहेत म्हणून ओरड करीत असतात.दुसरीकडे आरक्षित जागांचे लाभार्थी समूह व या समूहाच्या अंतर्गत, परीघावर किंवा परिघाबाहेर असलेले गट आमच्या वाट्याला पुरेसे लाभ येत नाहीत आम्हालाही आरक्षण द्या असे म्हणून ओरड करीत असतात. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओरड करणारे आरक्षणाचे विरोधक किंवा वर्गीकरणवादी समर्थक या दोन्ही गटांचा आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आरक्षण म्हणजे भौतिक लाभ मिळविण्याचे साधन अशा प्रकारचा आहे. जेथे भौतिक लाभासाठीचा पाशवी स्वरूपाचा संघर्ष उभा राहतो तेथे नैतिकता,तत्वज्ञान,मूळ संकल्पना व दूरगामी परिणाम या मूल्यांना काहीही महत्व उरत नाही. यामुळे मूळ संकल्पना समजून घेऊन मुद्द्यांवर एकमत घडवून सामोपचाराने तोडगा काढण्यास कोणताही गट तयार होत नाही.प्रत्येक गट आ...