शेती संकट आणि उपाय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कालजयी दृष्टिकोन...!!!
शेती संकट आणि उपाय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कालजयी दृष्टिकोन (प्रबंध: 'स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज' या निमित्ताने) आज आपला भारत देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत असला, तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जबाजारीपणा आणि शेतीचे कोलमडलेले अर्थशास्त्र हा अजूनही देशासमोरील सर्वात मोठा चिंतेचा विषय आहे. जेव्हा जेव्हा शेती संकटाचा उल्लेख होतो, तेव्हा आपण सहसा तात्पुरत्या उपायांचा, अनुदानाचा किंवा कर्जमाफीचा विचार करतो. परंतु, आजपासून तब्बल १०८ वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१८ मध्ये, एका तरुण भारतीय अर्थतज्ज्ञाने भारतीय शेतीच्या या आजाराचे मूळ शोधून त्यावर अत्यंत शास्त्रोक्त आणि कायमस्वरूपी उपाय मांडले होते. ते महान अर्थतज्ज्ञ म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा तो ऐतिहासिक प्रबंध म्हणजे 'Small Holdings in India and Their Remedies' (भारतातील अल्प भूधारकता आणि त्यावरील उपाय). आपण बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून ओळखतो, पण ते भारताचे पहिले उच्चविद्याविभूषित कृषी अर्थशास्त्रज्ञ (Agricultural Economist) देखील हो...