Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाड सत्याग्रह: सामाजिक क्रांतीपासून चवदार तळ्याच्या न्यायालयीन विजयापर्यंतचा रणसंग्राम...!!!

Image
1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर - (महाड सत्याग्रह) १९२७ उजडला, मागील वर्षी जे अस्पृश्यता निवारनाचे वारे देशभर वाहू लागले होते त्याचं आता वादळात रुपांतर होण्यास सुरुवात झाली होती. जे संवर्ण या काळात गाफिल होते त्यांची झोप उडविणाच्या दिशेनी वाटचालु सुरु झाली. आता मनुच्या भिंतीना हादरे देणा-या अस्पृश्यांच्या सभाना उधान आले होते. जिकडे तिकडे एकच नाव, बाबासाहेब आंबेडकर. अन अशातच नविन वर्षाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथील महारांच्याविजयस्तंभाला सलामी देऊन, अस्पृश्यांची एक मोठी सभा घेत नव्या दमाने चलवळीची सुरुवात करण्यात आली. या सभेत बाबासाहेबानी इंग्रजांवर ताशेरे ओढतांना त्यांच्या दुटप्पी धोरणावर तुफान बरसले होते. ज्या ब्रिटिशाना पेशव्यांच्या विरोधात लढाईत विजयी मिळवुन देण्यासाठी महार सैन्यानी रक्त सांडले होते त्या महाराना लष्करभर्ती बंदी घातल्याचा निषेध नोंदविण्यात आला. ब्रिटीशानी लगेच लषकरभर्ती बंदी उठविली नाही तर त्यासाठी वेगळा सत्याग्रह करण्याचा संकेतही देऊन टाकला. बाबासाहेबांचा प्रभाव भारतीय राजकारणात वाढू लागला होता. संपुर्ण अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या पाठीशी उभा होता. लोकं त्...

ओबीसी आरक्षण आणि त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक योगदान...!!!

Image
  ओबीसी आरक्षण आणि त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ऐतिहासिक योगदान: एक सविस्तर विश्लेषण...!! भारतीय समाजव्यवस्थेत ज्या वर्गाला शतकानुशतके शिक्षणापासून आणि सत्तेपासून दूर ठेवले गेले, त्या 'इतर मागासवर्गीयांना' (OBC) न्याय मिळवून देण्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अत्यंत कळीची राहिली आहे. आज ओबीसी समाजाला जे २७% आरक्षण आणि इतर सवलती मिळत आहेत, त्याचा पाया बाबासाहेबांनी संविधानातच रचून ठेवला होता. १. कलम ३४०: ओबीसींसाठीचा 'ब्रह्मास्त्र' संविधान सभेत चर्चा सुरू असताना, बाबासाहेबांना हे ठाऊक होते की केवळ अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) यांना आरक्षण देऊन सामाजिक विषमता दूर होणार नाही. असा एक मोठा वर्ग आहे जो जातीव्यवस्थेमुळे मागासलेला आहे, पण ज्यांची गणना SC/ST मध्ये होत नाही. त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कलम ३४० ची तरतूद केली. या कलमानुसार:   * राष्ट्रपतींना अधिकार दिला की त्यांनी मागासवर्गीयांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी 'आयोग' (Commission) नेमावा.   * या आयोगाच्या शिफारसीनुसार सरकारने या वर्गाला आरक्षण आणि इतर सवलती...

भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास...!!!

Image
1】 चला आता... एक दीर्घ लेख देत आहे, मला माहीत आहे कोणीही वाचनार नाही, परंतु रेकॉर्ड रहावे म्हणून इथे पोस्ट करून ठेवत आहे... तुम्ही ही सेव्ह करून ठेवा, निवांतपणे वाचा... ❤️ ---------------------------------------------------------------------------- पेशवे साम्राज्याची अखेरची रात्र : भिमा कोरेगांवची लढाई -  १ जानेवारी १८१८ ---------------------------------------------------------------------------- ५ नोहेंबर१८१७ रोजी पेशवा दुसरा बाजीराव आणि इंग्रज यांच्यात खडकी येथे लढाई झाली, आणि बाजीराव पेशव्याची महाराष्ट्रावर असलेली जुलमी सत्ता पुढे लवकरच अल्पावधीत संपुष्टात आली. हे युद्ध होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे ३१डिसेंबर १८०२रोजी पेशवे व ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये झालेला तह बाजीरावाने मोडला. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे बडोद्याच्या गायकवाडांना पेशवे काही देणे लागत होते. त्यासंबंधाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली पेशव्यांशी बोलणी करण्याकरीता गंगाधरशास्त्री हे वकील म्हणून पुण्याला आले. परंतु, त्यांचा पंढरपूर येथे संशयास्पदरीत्या खून झाला. हा खून बाजीराव पेशव्याच्या सांगण्यानुसार त्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली...!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?यशवंत मनोहर...!!! डॉ. यशवंत मनोहर विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर यांची ‘डॉ. आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली?’ ही पुस्तिका २००५ साली प्रकाशित झाली आहे. नागपूरच्या युगसाक्षी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेतील हा संपादित मजकूर… मागल्या शतकात जोतीराव फुल्यांनी ‘जाळून टाकावा | मनुग्रंथ||’ असे म्हटले होते (समग्र वाङ्मय, महाराष्ट्र शासन, १९९१, पृ. ५५१). डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे ‘मनुस्मृती’ जाळली. ‘मनुस्मृती’ जाळण्याची योजना डॉ. आंबेडकरांनी आधीच ठरविलेली होती. ती योजनाबद्ध कृती होती. महाडला परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाच्या दारातच शृंगारलेली वेदी तयार करण्यात आली होती. प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या परिषदेतही तसा ठराव झाला होता. रात्री ९ वाजता त्या वेदीवर ‘मनुस्मृती’ एका अस्पृश्य बैराग्याच्या हस्ते जाळण्यात आली. डॉ. आंबेडकरांनी याच परिषदेत नव्या समताभारताच्या निर्मितीसाठी उपकारक ठरेल अशा नव्या स्मृतीची मागणी केली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर : कीर, नववी आवृत्ती १९९२, पृ. १०५-१०६).  या ठिकाणीच मांडल्या गेलेल्...