Posts

Showing posts from October, 2018

घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !!

Image
1】 घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली... !! घटना एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहली नाही, असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख !" १)  डॉ. बाबासाहेब आंबेडकर. २) एन.गोपालस्वामी अय्यंगार. ३) डी.पी.खेतान. ४) कृष्णास्वामी अय्यर. ५) बी. एल. मित्तल. ६) के. एम.मुन्शी. ७) सय्यद अहमद अब्दुल्ला. हेच सात विद्वान घटना मसुदा समितीचे सदस्य होते. घटना मसुदा समिती व घटना समिती या वेगवेगळ्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. मूळ घटना समिती १९४६ साली (स्वतंत्र्यपूर्व काळात) स्थापन करण्यात आली. त्यात एकूण ३७९ सदस्य होते तर स्वतंत्र्यानंतर १९४७ साली (स्वतंत्र्योत्तर काळात) भारत-पाक फाळणीनंतर स्थापन करण्यात आलेल्या घटना समितीत २९९ सदस्य होते. असे असले तरी घटना बनविण्याची अत्यंत महत्वाची पण तितकीच कठीण जबादारी घटना मसुदा समितीवर होती. सात विद्वानांच्या घटना मसुदा समितीतील दोनजण परदेशात गेले. अन्य दोनजण सतत आजारी असल्यामुळे बैठकांना येत नव्हते. एकाचे तर निधन झाले व एकजण स्वत:च्या कार्यात व्यस्...

धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुध्दमूर्ती?

Image
धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुध्दमूर्ती...? लाखो समाजबांधवांसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली. या सोहळ्यामागं अनेक हात काम करत होते. बाबासाहेबांनी आदल्या रात्रीच दीक्षा समारंभात बुद्धमूर्ती आणायला सांगितल्यानं कार्यकर्त्यांवर कसा बाका प्रसंग ओढवला होता, त्याविषयीच्या आठवणी जागवताहेत आता ९५ वर्षांचे साक्षीदार के. एन. खरे. १४ ऑक्टोबर १९५६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या ५ लाख अस्पृश्य समाजबांधवांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेणार होते. ११ तारखेलाच बाबासाहेबांचं माईसाहेबांसमवेत नागपूरात आगमन झालं. बौद्ध धम्म दीक्षा सोहळ्याच्या तयारीची सर्व जबाबदारी बौद्ध जन सभेच्या नागपूर शाखेकडे होती. वामनराव गोडबोले हे या सभेचे प्रमुख होते. नागपुरात आल्या आल्या बाबासाहेबांनी या सोहळ्याच्या तयारीबाबत बैठका घेतल्या. श्याम हॉटेलची रूम नंबर ११६ म्हणजे बाबासाहेबांची 'वॉर रूम'च जणू. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष होतं. धम्म दीक्षा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला भिक्षूंनी परित्राण पाठाला सुरवात केली. श्याम हॉटेलच्या रूम नंबर ११६ च्या खिडकीतून बाबासाहेब बाहेर बघत होत...

बुध्दाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन... !!

Image
1】 बुध्दाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन.. !! बुद्ध स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक होता अशा आशयाची मांडणी अधूनमधून काही ब्राह्मणवादी किंवा डाव्या पुरोगामी चळवळीतील स्त्री कार्यकर्त्यांकडून केली जाते. वास्तविकतः अशा प्रकारची मांडणी कॉ, शरद पाटील यांनी प्रथमतः केली. बाकी इतर सर्वजन त्यांची री ओढतात. बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा पुरस्कर्ता ठरविण्यासाठी बुद्धाने स्त्रियांच्या संघ प्रवेशाला प्रथमतः अनुमती नाकारणे व नंतर जेव्हा अनुमती दिली त्यावेळी प्रव्रजित स्त्री भिक्खुनीना आठ गुरुधम्माच्या अटी बंधनकारक करणे हे एकमेव उदाहरण दिले जाते. या एकाच कारणामुळे बुद्धाला स्त्री-पुरुष विषमतेचा समर्थक ठरविणे म्हणजे ओढून ताणून बुद्धावर स्त्रीयांविषयी अनुदार किंवा पक्षपाती असल्याचे लांछन लावणे होय. बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन तपासायचा असेल तर केवळ एकमेव तेही सोयीनुसार अर्थ लावलेल्या उदाहरणावरून नव्हे तर बुद्ध विचाराचे समग्र विश्लेषण करूनच तपासले पाहिजे. या अनुषंगाने बौद्ध साहित्यातील समकालीन संदर्भाच्या आधारे बुद्धाचा स्त्रीयासंबंधींचा दृष्टीकोन स्पष्ट करण्याचा हा प्रयत्न या संदर्भाती...

"धम्मचक्र प्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी" याचे महत्त्व...आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील भाषण...!!!

Image
1] "धम्मचक्र प्रवर्तन, धर्मांतर आणि अशोक विजयादशमी" मित्रांनो, आपण प्रगतिशील विचारांचे वारसदार आहोत, त्याचे वाहक आहोत आणि म्हणून काही अनावधानाने झालेल्या चुकीच्या गोष्टींचे आपण पुनर्विचार केला पाहिजे...  कृपया हा लेख नीट वाचा चिंतन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मात्र जरूर कळवा...  भ. बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्यानंतर, सारनाथ येथे सर्वात प्रथम त्यांनी पांच भिक्खूंना धम्माची व्याख्या सांगितली. धम्माची तत्वे सांगताना त्यात चार अरिय सत्य, अरिय अष्टांगिक मार्ग, प्रतित्यसमुत्पाद, कार्यकारणभाव, अनित्यता आणि अनात्मा ही तत्वे सांगितले. एका धम्माची तत्वे सर्वात पहिल्यांदा सांगितली गेल्यामुळे, म्हणजेच धम्माचे चक्र पहिल्यांदाच फिरवल्यामुळे या दिवसाला "धम्मचक्रप्रवर्तन दिन" असे म्हणतात.  तो दिवस आषाढ पौर्णिमेचा असल्याने आणि भ.बुद्धांसारख्या गुरूने आपल्या शिष्यांना प्रथमच संपूर्ण ज्ञान दिल्याने या पौर्णिमेला "गुरु पौर्णिमा" असे म्हणायला सुरुवात झाली. बौद्ध राष्ट्रांमध्ये देखील हीच आषाढ पौर्णिमा धम्मचक्रप्रवर्तन दिन म्हणून साजरी करण्यात येते. बुद्धोत्तर काळात देखील ही...