ॲट्रॉसिटी ॲक्ट: केवळ कायदा नव्हे, तर मानवी प्रतिष्ठेचे कवच...!!
ॲट्रॉसिटी ॲक्ट: केवळ कायदा नव्हे, तर मानवी प्रतिष्ठेचे कवच...!! भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला आहे. परंतु, शतकानुशतके चालत आलेल्या जातीय विषमतेच्या पाशातून समाजाला बाहेर काढण्यासाठी केवळ 'समानता' लिहून पुरेसे नव्हते. त्यासाठी गरज होती एका भक्कम कायदेशीर संरक्षणाची. याच गरजेतून 'अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९' म्हणजेच 'ॲट्रॉसिटी ॲक्ट' जन्माला आला. १. ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संविधानाचा आधार हा कायदा अचानक अस्तित्वात आलेला नाही. भारतीय संविधानातील कलम १७ नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. मात्र, समाजात प्रत्यक्ष वावरताना दलित आणि आदिवासी बांधवांना ज्या हिंसेला आणि अपमानाला सामोरे जावे लागत होते, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी १९५५ चा 'नागरी हक्क संरक्षण कायदा' अपुरा पडू लागला. परिणामी, अधिक कडक तरतुदी असलेला १९८९ चा कायदा संमत करण्यात आला. २. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी.. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमीच सांगितले होते की, "जोपर्यंत सामाजिक लोकशाही प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत राज...