Posts

Showing posts from June, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार.... !!!

Image
1】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुणे करार... !! गोलमेज-२ संपल्यावर बाबासाहेब भारतात न येता अमेरीकेस जातात. तिथे काही महत्वाची कामं पार पाडुन ४ जानेवारी १९३२ लंडनला परत येतात. आठवडाभर लंडनमधे थांबुन १५ जाने १९३२ रोजी भारतास रवाना झाले. बाबासाहेब लंडहून निघतानाच शिवतरकराना मुंबईत पोहचण्याची तारीख कळविली. बाबासाहेब येणार म्हणून  स्वागतासाठी ईकडे मुंबईत अस्पृश्यानी जंगी तयारी केली. आज आपला अनभिषिक्त राजा येणार अन ते ही गोलमेज-२ ची जंग एक हाती लढवून येणार याचा कोण अभिआन वाटत होता. प्रत्येक दलिताचं ऊर दाटून आलं होतं. दलितांची बाजू भक्कमपणे मांडताना गांधी व तमाम शत्रूच्या गोटात शिरून आपल्या बापानी गो-यांच्या भुमीत मोठा पराक्रम गाजविला होता. नुसतं पराक्रमच नव्हे तर वेळ प्रसंगी अत्यंत चालाखिने ब्रिटिशांशी खलबते  करुन अनेक ठिकाणी परिस्थितीला आपल्या बाजुने वळते केले होते. पत्रकार व इतर मंडळींची मदत घेताना दलितांच्या हितात जाणारी प्रत्येक गोष्ट घडवून आणली. चलाखी व राजनितीक मुत्सद्दीपणाच्या सर्व युक्त्या वापरल्या. बाबासाहेबांच्या आतील राजकीय पुरूष गांधीमधल्या खलपुरुषाला लंडनच्या मैद...

भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...!!!

Image
भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...!  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली, ती केवळ एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून नव्हे, तर तो भारतीय समाजाशी केलेला एक 'नैतिक करार' होता. ही घटना लिहित असताना बाबासाहेबांच्या मनात भारतीय नागरिकांच्या विवेकबुद्धीवर आणि भविष्यातील नैतिक व्यवहारावर गाढ विश्वास होता. त्यांना वाटले होते की, काळानुरूप हे लोक लोकशाही मूल्यांचा स्वीकार करतील आणि आपले वर्तन सुधारतील... १. राज्यघटनेचा 'अपेक्षावाद' आणि आपला प्रतिसाद आपली राज्यघटना केवळ हक्क देत नाही, तर ती आपल्याकडून काही किमान 'मानवीय अपेक्षा' ठेवते. संविधानातील 'मूलभूत कर्तव्ये' आणि 'मार्गदर्शक तत्वे' याचाच आग्रह धरतात. बाबासाहेबांना खात्री होती की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा समाज जातीयतेचा आणि विषमतेचा विळखा सोडून देऊन एकसंध राष्ट्र म्हणून उभा राहील. जर त्यांना हा विश्वास नसता, तर कदाचित त्यांनी शोषित घटकांसाठी वेगळ्या राजकीय वास्तवाचा विचार केला असता. परंतु, त्यांनी देशाच्या ऐक्याला प्राधान्य दिले, कारण त्यांना वाटले होते की 'लोक इतिहासात...