Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण...!!!!

Image
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं परराष्ट्र धोरण...!!!! केंद्रातील सत्तांतरानंतर बदललेल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न, चीनलगतच्या सीमेवर साधनसंपत्तीचा विकास, ऍक्ट ईस्ट पॉलिसी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये कायम सदस्यत्त्व मिळवण्यासाठीचे प्रयत्न या सर्वांमुळे भारतामध्ये परराष्ट्र धोरणाला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. परंतु सध्याच्या या धोरणांबाबतचे विचार 1950च्या दशकामध्येच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदृष्टीने मांडले होते. पं. नेहरूंचा प्रभाव भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार म्हणून पं. नेहरूंचा उल्लेख केला जातो. याचे कारण पं. नेहरू हे जवळपास दीड दशक पंतप्रधानपदाबरोबरच परराष्ट्र मंत्रीही होते. त्यामुळे परराष्ट्र धोरणावर त्यांचा जबरदस्त प्रभाव होता. हा प्रभाव इतका होता की, केवळ नेहरूंनाच यासंदर्भातील ज्ञान आहे, असे सूत्र बनले होते. खुद्द महात्मा गांधीदेखील, पं. नेहरू हे परराष्ट्र धोरणातील माझे गुरू आहेत, असे म्हणत असत. त्या काळामध्ये संसदेत परराष्ट्र धोरणासंदर्भात नेहरूंची जी भाषणे होत असत त्यावर फ...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांची वकिली...!!

Image
1】बॅरिस्टर डॉ बाबासाहेब आंबेडकर एक निष्णात वकील... !! बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार म्हणून सर्व जग ओळखते. अमेरिकेतील कोंलबिया विद्यापीठात बाबासाहेबांचे विचारशिल्प आहे. बॅ. बाबासाहेब हे एक उत्तम वकील होते. तसेच त्यांनी उलटतपासात अनेकांची भंबेरी उडवली व खटल्यातील सत्य न्यायालयामसोर उघड करून अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिला, याची फार कमी लोकांना माहिती असेल. बॅ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने माढा तालुका न्यायालय व सोलापूर जिल्हा न्यायालय पावन झालेले आहे. बॅ. बाबासाहेब जे खटले लढले ते गोरगरिबांसाठी व समाजातील वंचित वर्गाकडून सामाजिक भावनेने लढले. इंग्लंडमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण घेताना त्यांना अतोनात त्रास झाला. बॅरिस्टर होऊन ते ज्यावेळी भारतात आले व मुंबई उच्च न्यायालयात वकिली चालू केली तेव्हा त्यंना अस्पृश्तेचा कटू अनुभव आला. बार लायब्ररीमध्ये ते ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चभ्रू समाजातील वकील फिरकत नव्हते. खरे म्हणजे तो प्रसंगच त्यांचे पुढील अस्पृश्तेविरूद्धच्या लढय़ाचे स्फुलिंल्ग ठरला व त्यांनी अस्पृश्तेविरूद्ध लढा देण्याचे ठरविले. बॅ. बाबास...

बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर यांचे अनमोल विचार...!!!

Image
१】 कार्ल मार्क्सच्या तत्वज्ञानाशी मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे, पण हे त्याचे म्हणणे मला पटण्यासारखे नाही.....मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजे सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या परस्परविरोधी गोष्टी आहेत. (truth and authority are inconsistent) शास्त्र सुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णत: (finality) मान्य करीत नाही. म्हणून सत्य सुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुन: पुन्हा शोध करणे प्राप्त असते. म्हणून जगामध्ये पूर्णत: पवित्र असे काहीच नाही..... -विश्वरत्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर...✍📚 [ Ref: 20 जून 1946 सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय मुंबई नवयुग : 13 एप्रिल 1947 ] ------------------------------------------------------------------------ २】बुद्ध की मार्क्स...! "बौद्ध तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया व कार्ल मार्क्सचा तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया यात काहीही फरक अढळत नाही. याचाच अर्थ असा की मार्क्सने प्रस्थापित केलेला सिद्धांत हा ही नवीन नाही. तेव्हा जीवनाचा मुलभूत पाया शोधण्यासाठी कोणत्याही बौद्ध बांधवास कार्ल मार्क्सच...

शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी... व शाहू महाराजांच्या जीवनातील त्यांची ठोस कामे...!!!

Image
1】 आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती....!!💐💐 फुले शाहू आंबडेकर हे पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडच...

साधु संताविषयी बाबासाहेबांची ठोस मतं...!!!

Image
1] साधुसंतांची शिकवण केवळ विद्वानांच्या शिकवणुकीपेक्षा कितीही भिन्न आणि उत्कर्षकारी असली तरी सुद्धा शोकजनक रीतीने ती अपयशी ठरली हे कोणालाही मान्य करावेच लागेल.दोन कारणांसाठी ही शिकवण निष्फळ ठरली.पहिली म्हणजे कोणत्याही संताने जातीपद्धतीवर हल्ला केलेला नाही.तर याविरुद्ध ते जातिभेदावर पूर्ण विश्वास ठेवणारे होते.त्यांच्यापैकी बहुतेक संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले व मेले.माझ्या माहितीनुसार संतांनी जातीभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरुद्ध कधीही युद्ध पुकारले नाही. माणसा माणसात चाललेल्या भांडणाशी त्यांचा कसलाही संबंध नव्हता तर माणूस आणि देव यांच्याशी असलेल्या नात्याशीच त्यांचे कार्य समबंधीत होते. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश अत्यंत भिन्न असून अत्यंत निरुपद्रवी आहे.कारण याचा उपदेश करणे कठिणही नाही व त्यावर विश्वास ठेवण्यात कसलाही धोका नाही..... संतांचे कार्य निष्फल ठरले याचे दुसरे कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना अशी शिकवण देण्यात आली की संतांनी जरी जातनियमचे उल्लंघन केले तरी सामान्य लोकांनी तसे करू नये.म्हणूनच सामान्य लोकांना अनुसरण करण्यासाठी आदर्श म्हणून संतांचा कधीच उपयोग ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशाला लाभलेले सर्वोत्कृष्ट असे कामगार नेते !!

Image
1】 डॉ. आंबेडकर आणि कामगार कायदे... !! तेव्हा समग्र भारतातील कामगारांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती. मालक- भांडवलदार वर्ग दुर्बल, असंघटित कामगारांना वाट्टेल तसा राबवित. कामगार संघटनासुद्धा मालकधार्जिन्या असल्यामुळे कामगारांचे अस्तित्व गोठवून टाकले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कामगारांबद्दल आस्था होती. जिव्हाळा होता. कामगारांनी स्वाभिमानशून्यतेचे जीवन कंठणे नाकारले पाहिजे. प्रतिकार केला तरच शोषणाचे उच्चाटन होईल. अन्यथा गुलामीचे जीवन जगावे लागेल, असे त्यांचे स्पष्ट मत होते. प्रा चीन भारताच्या इतिहासात चातुर्वर्ण्य समाजव्यवस्थेने माणसां-माणसांत दरी निर्माण केली. समाजाचे विघटन झाले. धर्मांध-जातीयवादी समाजव्यवस्थेने दलित अस्पृश्यांना तुच्छतेने वागविले. सत्तासंपत्तीपासून वंचित ठेवणे. वाट्टेल तसे राबवून घेतले आणि मोबदला मात्र अल्प द्यायचे. बारा बलुतेदारी निर्माण करणाऱ्या उन्मत समाजव्यस्थेने दलित अस्पृश्यांची दयनीय अवस्था केली होती. शोषित, कष्टकरी, कामगार वर्ग मात्र गुलामीचे जीवन कंठत होते. अशावेळी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाज चळवळीने १८७३ मध्ये पारंपरिक समाज चौकट उद्‍ध्वस्...