भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...!!!
भारतीय राज्यघटना: एक नैतिक करार आणि आपली जबाबदारी...! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली, ती केवळ एक कायदेशीर दस्तऐवज म्हणून नव्हे, तर तो भारतीय समाजाशी केलेला एक 'नैतिक करार' होता. ही घटना लिहित असताना बाबासाहेबांच्या मनात भारतीय नागरिकांच्या विवेकबुद्धीवर आणि भविष्यातील नैतिक व्यवहारावर गाढ विश्वास होता. त्यांना वाटले होते की, काळानुरूप हे लोक लोकशाही मूल्यांचा स्वीकार करतील आणि आपले वर्तन सुधारतील... १. राज्यघटनेचा 'अपेक्षावाद' आणि आपला प्रतिसाद आपली राज्यघटना केवळ हक्क देत नाही, तर ती आपल्याकडून काही किमान 'मानवीय अपेक्षा' ठेवते. संविधानातील 'मूलभूत कर्तव्ये' आणि 'मार्गदर्शक तत्वे' याचाच आग्रह धरतात. बाबासाहेबांना खात्री होती की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा समाज जातीयतेचा आणि विषमतेचा विळखा सोडून देऊन एकसंध राष्ट्र म्हणून उभा राहील. जर त्यांना हा विश्वास नसता, तर कदाचित त्यांनी शोषित घटकांसाठी वेगळ्या राजकीय वास्तवाचा विचार केला असता. परंतु, त्यांनी देशाच्या ऐक्याला प्राधान्य दिले, कारण त्यांना वाटले होते की 'लोक इतिहासात...